सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
  • विदर्भात शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव समोर; उपराजधानी नागपूर विभागात गेल्या 8 महिन्यात 296 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा
  • मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा; सर्वपक्षीय आमदारांची अजित पवारांकडे मागणी, कॅबिनेट बैठकीत निर्णयाची शक्यता
  • बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही; बीडमधून धनंजय मुंडे यांची मागणी
  पर्यटन

चारधाम प्रवास वर्णन, भाग ६६ - उमेश कुगांवकर, ठाणे

उमेश कुगांवकर    11-09-2021 08:05:12

भाग ६५ पासून पुढे

केदारनाथ मंदिर

   उत्तराखंड मध्ये हे मंदिर आहे.

 उत्तराखंड मधील चारधाम यात्रेमध्ये

 यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ अशी यात्रा होते. आठव्या शतकात हे मंदिर उभारले असं म्हणतात. पुढे याच शतकात  शंकराचार्य यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला.

  क त्यू री   शैलीत हे मंदिर बांधले आहे. सहा फूट उंच असा एकसंघ  असा चौथरा आहे. भारतातील बहुतेक मंदिर पूर्व-पश्चिम असतात... पण हे मंदिर अपवाद आहे. ते उत्तर दक्षिण आहे. हेच त्याचं वैशिष्ट्य!

   मंदाकिनी नदीच्या किनारी हे मंदिर आहे.

   अक्षय तृतीया या दिवाशी कपाट उघडतात. ( दरवाजा). आणि दिवाळीत भाऊ बीज दिवशी कपाट बंद करतात.

 

केदारनाथ  चा परिसर अतिशय रमणीय आहे. कधी कधी बर्फ सुद्धा कमी जास्त प्रमाणात पहायला मिळतो. इतकेच नव्हे तर कधीकधी लहान मोठ्या glacier ला सुद्धा ओलांडून जावे लागते..

 पण त्यातही मजा येते. एक वेगळा अनुभव असतो. तो घ्यायला काय हरकत आहे. थोडासा 'थ्रील ' असावच प्रवासात..

अशा प्रकारच्या बर्फातून सुद्धा लोक आपला  काढीत असतात. त्यात चालणानारे

 घोडेवाले, कंडी वाले, जाणारे येणारे आपला मार्ग काढीत असतात. अगदी स्वतःलाही सुरक्षित ठेवून.

अति उंचीमुळे काही लोकांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे त्रास होतो... म्हणून सरकारने ऑक्सिजनची सुद्धा  व्यवस्था केलेली आहे. एखादा सिलेंडर आपल्या जवळ ठेवावा. नको असल्यास कुणाला तर देऊन टाकावा. एवढच सत्कर्म आपल्याकडून होईल. रात्रीच्या वेळी थंडी मात्र खूपच असते. ब्लॅंकेट्स तोंडावरून घेतले तर आप जीव गुदमरतो, नाही घ्यावे तर थंडी वाजते... मोठी विचित्र परिस्थिती असते... तरीही आपणच  मार्ग काढला पाहिजे.

गौरीकुंड ते केदारनाथ साधारण सतरा अठरा किलोमीटरचा प्रवास आहे. रस्ताही असाच अजगरासारखा पसरलेला असतो. त्यामुळे काही जणांना रस्ता पाहूनच घाम फुटतो.

गौरीकुंड हुन जे लोक चालू शकत नाहीत त्यांच्यासाठी 'कंडी' उपलब्ध असतात.. त्यांचे 'रेट' सुद्धा सरकारने ठरविलेले आहेत. त्यामुळे 'घासाघीस ' हा प्रकार इथं नाहीच. एकटा माणूस किंवा चार माणसं तुम्हाला घेऊन जातात. आपण आपली सोय पहायची..

 आणि मार्ग काढायचा....

 


 Give Feedback



 जाहिराती