सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा; उपराष्ट्रपतींकडे पत्र सादर, बारामती विजयानंतर तातडीने निर्णय
  • पश्चिम बंगालनंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, क्लीन स्वीप मोहीम राबवणार, कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात
  • थलपती विजय तमिळनाडूचा सेनापती होणार! बहुमतासाठी आवश्यक 10 आमदारांसाठी मास्टरप्लॅन सुद्धा ठरला
  • ममता बॅनर्जींचा पराभव नाही, मोदी शाहांनी इराण, इस्त्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली, हा 'लोकशाहीविरोधी' कट; संजय राऊतांचा घणाघात
  • 'वंदे मातरम्'चा अपमान आता महागात पडणार; केंद्राचा मोठा निर्णय, कायद्यात सुधारणा! 3 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड
 शहर

पुणेकरांना तात्पुरता दिलासा; ३१ मेपर्यंत पाणीकपात नाही, पण ‘एल निनो’ची चिंता कायम

डिजिटल पुणे    06-05-2026 11:33:52

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरात सध्या पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने ३१ मेपर्यंत पाणीकपात न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

सध्या पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये मिळून सुमारे ९.५८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत हा साठा अधिक असल्यामुळे तातडीने कपात करण्याची गरज नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, ३१ मेनंतर पावसाचा अंदाज आणि पाण्याची स्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, ‘एल निनो’मुळे यंदा पावसावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने प्रशासन सतर्क आहे. जलसंपदा विभागाने आधीच १५ टक्के पाणीकपातीचा प्रस्ताव दिला होता. तरीही सध्याच्या परिस्थितीत तो लागू करण्यात आलेला नाही.

दुसरीकडे, पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असलेले उजनी धरण चिंतेचा विषय ठरत आहे. उजनी धरणातील पाणीसाठा मृत पातळीखाली गेल्याची माहिती समोर आली आहे. धरणाची एकूण क्षमता ११७ टीएमसी असताना सध्या सुमारे ६३ टीएमसी पाणी शिल्लक असून त्यातील बहुतांश मृत साठा मानला जातो. त्यामुळे पुढील काही महिन्यांत पाण्याचे नियोजन आव्हानात्मक ठरणार आहे.

याच पार्श्वभूमीवर ‘एल निनो’च्या संभाव्य परिणामांना सामोरे जाण्यासाठी कृषी विभागानेही तयारी सुरू केली आहे. कमी पावसात अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांच्या पद्धतींचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जात आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हवामान अनुकूल शेती, पाणी व्यवस्थापन आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर यावर भर दिला जात आहे.एकंदरीत, सध्या पुणेकरांना पाणीकपातीपासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी आगामी काळात पावसाच्या अनिश्चिततेमुळे परिस्थिती बदलू शकते, अशी शक्यता नाकारता येत नाही.


 Give Feedback



 जाहिराती