सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 राज्य

शरद पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; कौतुकाचा वर्षाव करत केली ही मोठी मागणी

डिजिटल पुणे    15-03-2025 12:46:07

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. आपल्या पत्रात पवार यांनी मोदी यांच्या भाषणाचे कौतुक करताना, ते संपूर्ण जगभरातील मराठी लोकांना भावल्याचे म्हटले आहे.

या पत्राविषयी माहिती देताना नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सांगितले की, साहित्य संमेलनाच्या ठिकाणी तीन महापुरुषांचे पुतळे उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यांसाठी सरहद संस्थेने प्रस्ताव मांडला आहे, तर काही साहित्यिकांनी पूर्ण आकाराचे अश्वारूढ पुतळे उभारण्याची मागणी केली आहे.

तालकटोरा स्टेडियम हे नवी दिल्ली महानगरपालिकेच्या (NDMC) अखत्यारीत येत असल्याने अश्वारूढ पुतळे बसविण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळाव्यात, यासाठी पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्ली सरकार आणि NDMC ला निर्देश देण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, राज्यातील काही ठिकाणी परिस्थिती बिघडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बीड जिल्ह्यात यापूर्वी कधीही अशा घटना घडल्या नव्हत्या. सर्व समाज एकत्रित राहून जिल्ह्याचा विकास होत होता, मात्र अलीकडच्या घटनांमुळे तेथील शांतता भंग होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

यापूर्वीही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीत आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. हे संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान पार पडले. संमेलनाच्या दरम्यान काही राजकीय घडामोडींचीही चर्चा झाली होती. आता शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

 


 Give Feedback



 जाहिराती