सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 DIGITAL PUNE NEWS

पंढरपूरच्या आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर; तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज पालखीचं प्रस्थान कधी?

डिजिटल पुणे    02-05-2025 15:35:35

पुणे : वारकरी सांप्रदायात आषाढी एकादशीला खास महत्व आहे. या खास दिवशी राज्यासह शेजारील राज्यातील वारकरी मंडळी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत असतात. यातील बहुतांनी वारकरी पायी दिंडीत चालत विठुनामाचा गजर करत विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतात आणि चंद्रभागेत स्नान करतात. दरवर्षी आळंदीवरुन संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्याही पंढरपूरला जातात. आता या दोन्ही पालख्यांचं वेळापत्रक जाहीर झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक पालख्या पंढरपूरला आषाढी एकादशीसाठी जात असतात. यातील संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांना खास महत्व आहे. यंदा 18 जून 2025 रोजी देहूतून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. तसेच 19 जून 2025 रोजी आळंदीतून ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. या दोन्ही पालख्यांसोबत लाखो वारकरी पायी पंढरीला जाणार आहेत.

संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे वेळापत्रक

संत तुकाराम महाराजांची पालखी 18 जून रोजी निघणार आहे. या पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डी येथे असणार आहे. दुसरा मुक्काम पुणे शहरातील नानापेठेत असणार आहेत. 21 जून रोजी तुकाराम महाराजांची पालखी निवडुंगा विठ्टळ मंदिरात असेल. 22 जूनला या पालखीचा मुक्काम लोणीकारभोर मध्ये असणार आहे. त्यानंतर 23 तारखेला यवत, 24 तारखेला वरवंड, 25 तारखेला उडंबडी गवळ्याची, 26 तारखेला बारामती, 27 जून सणसर, 28 जून निमगाव केतकी, 29 जून इंदापूर, 30 जून सराटी, 1 जुलै अकलूज, 2 जुलै बोरगाव श्रीपूर, 3 जुलै पिराची कुरोली, 4 जुलै वखारी (पंढरपूर) येथे तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा प्रवास

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 19 जून रोजी आळंदीतून निघणार आहे. त्यानंतर 20 जून रोजी पुण्यातील भवानीपेठेत माऊलींच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. 21 जून रोजीही पुण्यातच ही पालखी मुक्कामी असणार आहे. ही पालखी 22 जून रोजी सासवडच्या दिशेने निघणार आहे. ही पालखी 24 जून जेजुरी, 25 जून वाल्हे, 26 जून रोजी लोणंद, 27 जून तरडगाव, 28 जून फलटण आणि 29 जून बरड येथे मुक्कामी असेल. माऊलींची पालखी 30 जून नातेपुते, 1 जुलै रोजी माळशिरस, 2 जुलै रोजी वेळापूर, 3 जुलै भंडीशेगाव आणि 4 जुलै वाखरी येथे मुक्कामी असणार आहे. या दोन्ही वाऱ्यांसोबत लाखो वारकरी पंढरीला विठूरायाच्या दर्शनाला जाणार आहेत.


 Give Feedback



 जाहिराती