सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 DIGITAL PUNE NEWS

अनुमान किंवा कल्पना निरसन (भाग २)

डिजिटल पुणे    05-05-2025 10:37:50

अनुमान किंवा कल्पना निरसन (भाग २)
 
कल्पून निर्मिले मंत्र | देव ते कल्पनामात्र | देव नाही स्वतंत्र | मंत्राधेन ||९/५/२१||
 
कोणीतरी कल्पनेने मंत्र रचतो, त्या मंत्राची देवता कल्पनेतून निर्माण होते. सर्व देव मंत्रांच्या अधीन आहेत.
 
या गोष्टी स्पष्ट बोलण्याच्या नसून मनातल्या मनात ओळखून असाव्यात. चालण्याच्या पद्धतीवरून आंधळा व्यक्ती ओळखला जातो. तसे बोलणे अनुभवाचे आहे का नाही हे शहाणे ओळखतात. ज्याला जसा भास झाला तसे त्याने देवतांवर कवित्व केले. हे केलेले वर्णन अनुभवावरून ठरवले पाहिजे.
 
जसे – ब्रह्मदेवाने विश्व निर्मिले मग त्या ब्रह्मदेवाला कोणी निर्मिले ? विष्णूने विश्व पालन केले मग त्या विष्णूस कोण पाळते ? विश्वसंहार कर्ता रुद्र आहे मग त्या रुद्राचा संहार कोण करतो ? काळ सगळ्यांचे नियमन करतो मग त्याचे नियमन कोण करतो ? असे प्रश्न पडतात पण यांची उत्तरे देता येत नाहीत तोपर्यंत अज्ञानाचा अंधार दूर होणार नाही. म्हणून सारासार विचार करावा.
 
जे पिंडी ते ब्रह्मांडी असे मानण्यात कशा अडचणी येतात ते आता बघू. ब्रह्मांड आपोआप घडले पण त्याची रचना पिंडासारखी आहे अशी कल्पना केली आहे. पण याचा अनुभव कोणाला कधी आला नाही. याचा शोध घेऊ गेल्यास अनेक संशय निर्माण होतात. म्हणून ही कल्पना आहे हे निश्चितपाने समजावे. ब्रह्मांडात असंख्य पदार्थ आहेत मग हे सर्वच पिंडात कसे असतील ? उदा. – ब्रह्मांडात साडेतीन कोटी भुते आहेत, साडेतीन कोटी तीर्थे आहेत, साडेतीन कोटी मंत्र आहेत, तेहेतीस कोटी देव आहेत, अठ्ठ्यांशी हजार ऋषीश्वर आहेत, नऊ कोटी कात्यायनी देवता, छपन्न कोटी चामुंडा, चौऱ्याशी लाख योनी, असे कोट्यावधी जीव आहेत, असंख्य वनस्पती, असंख्य रसाळ फळे, अनेक प्रकारची बीजे, धान्ये आहेत, हे सगळे पिंडात कसे असेल ? म्हणून उगाच पिंडा ब्रह्मांडाची रचना एकसारखी आहे असे उगाच बोलू नये.
 
आता पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे काय ? याचा नेमका खरा अर्थ समजून घेऊ – सर्व विश्व पंचमहाभूतांनी बनलेले आहे. पिंड देखील त्यापासूनच बनलेला आहे. हेच सत्य आहे आणि याचा रोकडा अनुभव घेता येतो. हे अनुभवाचे ज्ञान निश्चयात्मक असते. बाकी सर्व कल्पना मात्र आहे. हे कल्पनेचे ज्ञान ओकारीसारखे समजावे आणि बाजूस सारावे. कारण ब्रह्मांडातील सर्व स्थाने आणि पदार्थ एका पिंडात बघणे कल्पनेचा खेळ आहे. खरे सत्य हे आहे की हा सारा पंचमहाभूतांचा खटाटोप आहे जो पिंडी ते ब्रह्मांडी चालू आहे.
 
कथाव्यास/प्रवचनकार/लेखक : श्री. दामोदर रामदासी पुणे. (रामदासी मठ परंपरा, नवगणराजुरी, जिल्हा बीड)


 Give Feedback



 जाहिराती