सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 विश्लेषण

मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..

डिजिटल पुणे    09-05-2025 13:39:16

 मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. एकीकडे भारत आणि पाकिस्तान मध्ये जोरदार युद्ध सुरु असताना दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ड्रोनच्या घिरट्या सुरु आहेत. मुंबईतील हजरत तय्यद जलाल मस्जिदच्या वरती हा ड्रोन दिसून आला होता, त्यानंतर तो गायब झाला. स्थानिक नागरिकांनी याबाबत दावा केला आहे, यानंतर साकीनाका पोलिस तातडीने ऍक्शन मोड मध्ये आले असून कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलं.. मात्र पोलिसाना काहीही संशयास्पद आढळलेले नाही. मात्र या घटनेने मुंबईत एकच खळबळ उडाली आहे

मस्जिदच्या वरती हा ड्रोन दिसून आला

प्राथमिक माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सहार विमानतळ येथून यासंदर्भात फोन आला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. हजरत तय्यद जलाल मस्जिदच्या वरती हा ड्रोन दिसून आला होता. काही क्षणांतच तो ड्रोन साकिनाका झोपडपट्टी परिसराच्या दिशेने गेला. एकीकडे देशात युद्धाची परिस्थिती असताना आणि पाकिस्तान ड्रोन हल्ल्याच्या प्रयत्नात असताना मुंबईत ड्रोनच्या घिरट्या पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साकीनाका पोलीस आणि सीआयएसएफ यांनी हरी मस्जिद परिसर जरीमरी येथे पहाटे पाच वाजताच्या दरम्यान कोंबिंग ऑपरेशन केले आहे. मात्र, यात असे ड्रोन वैगरे काहीही आढळून आले नाही. तरी नागरिकांनी पॅनिक होऊ नये, असे आवाहन साकीनाका पोलिसांनी केले आहे.

मुंबई हि नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिली आहे. देशावर सूद उगवायचा असेल तर अतिरेक्यांकडून सतत मुंबईवर हल्ला केला जातो हा इतिहास आहे. यापूर्वी १९९३ चा साखळी बॉम्बस्फोट आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामुळे मुंबई हादरली होती. आताही देशातील एकूण युद्धजन्य परिस्थितीच्या  पार्श्वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे की, कोणीही कोणत्याही दर्जाच्या अधिकाऱ्याला नवीन रजा मंजूर करणार नाही. सतर्कतेचा इशारा लक्षात घेऊन, सर्व पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकारक्षेत्रात राहण्यास आणि प्रत्येक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सध्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांशी उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. या बैठकीनंतर भारत पाकिस्तानविरोधात सर्वात मोठा आणि निर्णायक कारवाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतले जातात, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती