सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कुंडमळ्याजवळील पूल कोसळला
  • २०/२५ जण वाहून गेल्याची भिती
  • पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला
 DIGITAL PUNE NEWS

ठाकरे बंधूंची युती झाली तर काय परिणाम होणार? महापालिका निवडणुकीसाठी भाजपचं अंतर्गत सर्वेक्षण?

डिजिटल पुणे    05-06-2025 14:23:26

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उद्धल ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच आता राज ठाकरे यांचे पुत्र मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनीही दोन भाऊ एकत्र यावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. “आम्ही बोलून काही फरक पडणार नाही, दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही,मात्र त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा, दोघांकडे ही एकमेकांचा नंबर आहे”, असे अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. याचदरम्यान आता एक सर्वेक्षण अहवाल समोर येत आहे, तो म्हणजे दोन्ही बंधू एकत्र आले तर भाजपच काय होईल? काय आहे सर्वेक्षण अहवाल जाणून घेऊया…

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी) आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील युतीचा भाजपच्या निवडणूक भवितव्यावर कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) एका पदाधिकाऱ्याने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणाचा अहवाल देत असे म्हटले आहे.

भाजपने बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच पुणे आणि ठाणे यासह इतर प्रमुख महानगरपालिका संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. ज्या या वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांच्या विधानामुळे दोघांमध्ये संभाव्य समेट होण्याची शक्यता आहे आणि असे संकेत मिळत आहेत की ते “किरकोळ मुद्द्यांकडे” दुर्लक्ष करून हातमिळवणी करू शकतात.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मनसेने भाजपला पाठिंबा देऊ केला होता पण सहा महिन्यांनंतर दोन्ही पक्षांनी राज्य विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या. “ठाकरे बंधूंशी संबंधित राजकीय घडामोडी लक्षात घेता, भाजपने उद्धव-राज युतीचा मुंबईच्या निवडणूक परिस्थितीवर होणारा संभाव्य परिणाम तपासण्यासाठी एक सविस्तर सर्वेक्षण केले आहे,” असे भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अंतर्गत मूल्यांकनाच्या निष्कर्षांनुसार, त्यांच्या संभाव्य युतीमुळे शहरातील भाजपच्या संभाव्यतेला हानी पोहोचण्याची शक्यता कमी आहे असे ते म्हणाले.

यावेळी सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, भाजप तीन प्रमुख घटकांमुळे मुंबईत मजबूत स्थितीत आहे. त्यांच्या पारंपारिक मतदारांचा विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नेतृत्व आणि गेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत पक्षाची उत्कृष्ट कामगिरी केली. “पारंपारिक मराठी मतदारांचा आधार असलेल्या भागातही भाजपचा पाठिंबा स्थिर राहिला आहे. सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की ठाकरे बंधूंमधील युतीचा पक्षाच्या जागा संख्येवर प्रतिकूल परिणाम होणार नाही,” असे ते म्हणाले.

२०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईत उद्धव ठाकरेंचा प्रभाव कमी झाला आहे आणि पक्षाचे जवळपास निम्मे नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत, असे मूल्यांकनातून दिसून येते. दरम्यान, राज ठाकरेंचा प्रभाव मर्यादित मानला जातो, असे ते म्हणाले. बीएमसी निवडणुकीत भाजपने (एकूण २२७ पैकी) १५० जागा लढवल्यास त्याचा फायदा भाजपला होईल, असे पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यानुसार पक्षाची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती