सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कुंडमळ्याजवळील पूल कोसळला
  • २०/२५ जण वाहून गेल्याची भिती
  • पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला
 DIGITAL PUNE NEWS

रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा कशाला मागत आहात? त्यापेक्षा त्यांनी जाऊन स्थिती बघावी; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले

डिजिटल पुणे    09-06-2025 15:26:28

मुंबई : मध्य रेल्वेवरील दिवा ते मुंब्रा या स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून प्रवासी पडल्याची घटना समोर आली. जलद लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे हे प्रवासी रेल्वे रुळावर पडले. सोमवारी (9 जून) सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा रेल्वे स्थानकावर विरुद्ध दिशेची लोकल आणि समोरुन येणाऱ्या लोकल गर्दीमुळे अनेक धावत्या लोकलमधून पडून खाली पडले. पिक अवरची वेळ असल्यामुळे दोन्ही लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. या अपघातात 13 प्रवासी ट्रॅकवर पडले असून 4 जणांचा मृत्यू झाला. 

दररोज 72 लाख प्रवासी प्रवास करणाऱ्या मुंबई लोकलचं भयाण वास्तव आज ठाण्याजवळ झालेल्या भीषण अपघाताच्या घटनेनं समोर आलंय. मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान 13 प्रवासी रेल्वेमधून ट्रॅकवर पडले. कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी लटकून जात होते, त्याचवेळी सीएसएमटीवरुन निघालेली दुसरी लोकल प्रवाशांना घासली. त्यामुळे, झालेल्या अपघातात 13 प्रवासी खाली पडले आणि 4 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर आता मुंबई लोकलचा सुरक्षित प्रवास आणि मुंबईतील वाढती गर्दी यावरुन प्रतिक्रिया येत आहेत. लहानपणापासून मुंबईकर असलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया देताना तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा कशाला मागता, रेल्वेमंत्र्यांना तिथं जाऊन परिस्थिती बघू द्या, असेही राज यांनी म्हटले. 

मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले

मुंबईतील रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी आहे. या देशात माणसांची किंमत नाही. मुंबईतील रेल्वे कशी चालते हेच जगाला आश्चर्य आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. मुंबईतील मुंब्राजवळ घडलेल्या रेल्वे अपघातात 13 प्रवासी ट्रॅकवर पडले असून 4 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "या देशात माणसांची किंमत नाही, रेल्वे कशी चालते हेच आश्चर्य," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांनी रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा देण्याऐवजी परिस्थिती प्रत्यक्ष पाहावी, असेही म्हटले. वाढती गर्दी, वाहतुकीची गैरसोय, पार्किंगचा अभाव आणि अपुऱ्या सुविधा यावर त्यांनी सरकारला जाब विचारला आहे.

मी रेल्वेने प्रवास केला आहे, त्यामुळे मला प्रवास माहीत आहे. कारण, त्यावेळी गर्दी कमी असायची. आता, मुंबईत संध्याकाळी मेट्रोत शिरून दाखवा, आज ज्या कर्व्हवर अपघात झालाय तो काय नवा नाही. रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे, त्यापेक्षा त्यांनी जाऊन स्थिती बघावी, असेही राज यांनी म्हटले. तर, रेल्वेनं लोकलचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यावरही वास्तववादी प्रतिक्रिया दिली. लोकलचे डोर क्लोज केले तर लोकं गुदमरून मरतील, अशा शब्दात राज ठाकरेंनी मुंबईतील वाढती गर्दी आणि रेल्वे प्रशासनावर परखडपणे भाष्य केलं. 

अपघात कसा झाला

मुंब्रा रेल्वे अपघाताबाबत मध्य रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील धनराज नीला म्हणाले की, मुंब्राहून दिवाला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारे आठ जण खाली पडले. कसाराला जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या गार्डने घटनेची माहिती दिली. या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. ही घटना मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान डाउन/फास्ट लाईनवर घडली. कसाराहून येणाऱ्या लोकल ट्रेनच्या फूटबोर्डवर आणि सीएसएमटीकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करणारे लोक एकमेकांवर आदळले आणि खाली पडले.


 Give Feedback



 जाहिराती