सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताच महाराष्ट्रात मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं
  • आषाढी एकादशीला विठुरायाच्या पंढरीत अनर्थ घडला, वारीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडत आयुष्य संपवलं
  • अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला, जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
 जिल्हा

'जेन झी'च्या आंदोलनापुढे सरकारला माघार; राज ठाकरेंचा दावा, तरुणांचा राग आता थेट पंतप्रधानांपर्यंत

डिजिटल पुणे    25-07-2026 18:14:04

मुंबई : शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. वारंवार पेपरफुटीच्या घटनांनंतरही शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतला गेला नाही, त्यामुळे तरुणांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि अखेर सरकारला माघार घ्यावी लागली, असे ते म्हणाले. "एका वाक्यात सांगायचं तर 'जेन झी'ने सरकारच्या झिंज्या उपटल्या," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राज ठाकरे यांनी दावा केला की, तरुणांचा रोष आता केवळ शिक्षणमंत्र्यांपुरता मर्यादित नसून तो थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचला आहे. देशभरातील तरुणांच्या संघर्षाचा हा मोठा विजय असल्याचे सांगत त्यांनी शिवाजी पार्क येथे विजय आणि अभिनंदन सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

या आंदोलनात अभिजित दीपके यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगत, पुढील काळात ते जो निर्णय घेतील त्याला आपला पूर्ण पाठिंबा असेल, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

पेपरफुटीच्या घटना नवीन नसल्याचे नमूद करत राज ठाकरे म्हणाले की, अशा गंभीर प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून शिक्षणमंत्र्यांनी खूप आधीच नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा होता.


 Give Feedback



 जाहिराती