सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात वाहनांवर आता एमएच-12 ‘1A’; देशात प्रथमच एक अंक आणि एक इंग्रजी अक्षर मालिकेचा प्रस्ताव
  • शिंदेसाहेब, तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण धोका दिलात, मनोज जरांगेंची एकनाथ शिंदेंवर पहिली टीका, बावनकुळेंवरही हल्ला
  • सिंहगड रस्त्यावरील कोंडीवर उपाययोजना : महापौरांचा १५ दिवसांत वाहतूक सुधारणा आराखडा तयार करण्याचा आदेश
 जिल्हा

कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया; 'जात पडताळणी समितीच्या कामात सरकारचा हस्तक्षेप नाही'

डिजिटल पुणे    06-08-2026 14:37:19

मुंबई : मराठवाड्यातील चार मराठा महिला लोकप्रतिनिधींची कुणबी जात प्रमाणपत्रे जात पडताळणी समितीने रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. या निर्णयावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, जात पडताळणी समितीचे काम सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या नियमांनुसार चालते. या प्रक्रियेत राज्य सरकार किंवा कोणत्याही मंत्र्याचा हस्तक्षेप नसतो.

त्यांनी सांगितले की, विविध प्रकारच्या जात प्रमाणपत्रांच्या पडताळणीदरम्यान काही प्रमाणात अर्ज नाकारले जाणे ही नियमित प्रक्रिया आहे. कुणबी प्रमाणपत्रांसह इतर ओबीसी प्रमाणपत्रांमध्येही काही अर्ज आवश्यक निकष पूर्ण न झाल्यामुळे फेटाळले जातात. त्यामुळे जाणीवपूर्वक कोणाला लक्ष्य करून कारवाई केली जाते, असे म्हणणे योग्य ठरणार नाही.

फडणवीस यांनी पुढे सांगितले की, संबंधितांना निर्णयाबाबत आक्षेप असल्यास अपील करण्याचा अधिकार आहे. तसेच, पडताळणी प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या असतील तर त्यांची पूर्तता करण्याचीही संधी उपलब्ध आहे. आवश्यक वाटल्यास वरिष्ठ अधिकारीही या प्रकरणाची प्रक्रिया तपासून पाहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.


 Give Feedback



 जाहिराती