सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 विश्लेषण

मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना

डिजिटल पुणे    09-05-2025 17:59:24

मुंबई : भारत-पाकिस्तान सीमेवरील ताण वाढला आहे. पाकिस्तानकडून भारतातील विविध शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न होत आहे. मुंबई-पुण्यातही हल्ल्याचा धोका वाढला आहे. खासकरुन मुंबईवर सागरी मार्गाने हल्ला होण्याची भीती आहे. त्यामुळे भारतीय नौदलाने मुंबईतील मच्छिमारांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. 26/11 च्या हल्ल्याप्रमाणे दहशतवादी कारवायांसाठी मासेमारी नौकांचा गैरवापर होऊ शकतो. या भीतीमुळे किनारपट्टीवरील दक्षता वाढवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतर मच्छिमारांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नौदलाकडून मुंबईतील मच्छिमारांना महत्वाच्या सूचना

नौदल अधिकाऱ्यांनी बैठकीनंतर मच्छिमारांना प्रतिबंधित सागरी क्षेत्रात प्रवेश करू नये अशी सूचना दिली आहे. अधिकाऱ्यांनी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी सहकार्य करावे असे नमूद केले आहे. सुरक्षेचा एक भाग म्हणून मुंबईतील सर्व मासेमारी नौकांचे लवकरच सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यांचा डेटा मोबाईल अॅपद्वारे डिजिटल पद्धतीने गोळा केला जाणार आहे. यामुळे अधिकाऱ्यांना जहाजांचा मागोवा घेण्यास आणि त्यांचे निरीक्षण करण्यास मदत होणार आहे. नौदलाने हाय अलर्टही जारी केला आहे. या अलर्टमध्ये नौका जप्त केल्या जाण्याचा आणि शत्रू सैन्याकडून वापरल्या जाण्याचा धोका असल्याचे नमूद केले आहे. मुंबईच्या किनाऱ्यावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

पुण्यातही अलर्ट जारी

पुणे शहरातील अनेक संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सीमेवरील वाढत्या तणावादरम्यान सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ही दक्षता घेण्यात आली आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए), पुणे विमानतळ, शहरातील हवाई तळ आणि प्रतिष्ठित दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर यासारख्या प्रमुख ठिकाणी अतिरिक्त फौजफाटा तैणात करण्यात आला आहे. नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद वस्तू, व्यक्ती आढळल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ऑपरेशन सिंदूर

22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता, यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने अनेक भारतीय शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र सैन्याने पाकिस्तानी विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट केली आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील सध्या सुरू असलेल्या तणावाची जगभरात चर्चा होत आहे.

22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानकडून सूडाचा प्रयत्न सुरू असून, भारतातील प्रमुख शहरांना लक्ष्य केले जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती