सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती!
  • पाकिस्तान हादरला! उपपंतप्रधान इशाक बॅकफूटवर म्हणाले, “भारत थांबला तर आम्हीही मागे हटू”
  • भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
  • पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू काश्मीरचे आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; दोन कर्मचारी गंभीर जखमी
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 विश्लेषण

पाकिस्तान हादरला! उपपंतप्रधान इशाक बॅकफूटवर म्हणाले, “भारत थांबला तर आम्हीही मागे हटू”

डिजिटल पुणे    10-05-2025 18:03:02

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर जोरदार हवाई हल्ले केले. लष्कर, जैश आणि हिजबुल मुजाहिद्दीनसारख्या संघटनांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. भारताने स्पष्ट केलं होतं की, त्यांचे हल्ले केवळ दहशतवादी अड्ड्यांवरच मर्यादित होते, पाकिस्तानी लष्करी तळ किंवा नागरी भागांना लक्ष्य करण्यात आलं नव्हतं.

मात्र, पाकिस्तानने याला उत्तर देताना भारतीय लष्करी तळांवर आणि नागरी भागांवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले केले. भारताच्या अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टमने हे बहुतेक हल्ले हवेतच निष्क्रिय केले. भारताच्या संयमी, पण ठोस प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली.

आम्हाला शांततेची इच्छा आहे

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी स्थानिक जिओ टीव्हीशी बोलताना सांगितले की, “भारत आक्रमकता थांबवेल, तर पाकिस्तानही तणाव कमी करेल. आम्ही युद्ध नको म्हणतो, आम्हाला शांततेची इच्छा आहे.” त्यांनी हेही सांगितले की, पाकिस्तानने अमेरिका व इतर देशांशी संपर्क साधला असून, भारतानेच आता पाऊल मागे घ्यावं.

दरम्यान, भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने ‘ऑपरेशन बुनयान उल मर्सूस’ नावाने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उधमपूर, पठाणकोट, बठिंडा आणि भुज येथील भारतीय एअर फोर्स बेसला लक्ष्य केलं. पण त्यांच्या उच्च गतीच्या क्षेपणास्त्रांना भारतीय एअर डिफेन्सने निष्क्रिय केलं.

भारताने यानंतर प्रत्युत्तर देताना पाकिस्तानमधील रफीकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुक्कुर आणि चुनिया येथील लष्करी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांत पाकिस्तानच्या तांत्रिक केंद्र, कमांड अँड कंट्रोल रूम, रडार केंद्रे व शस्त्र साठ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हे हल्ले करताना भारताने नागरी भागांना कोणताही इजा होऊ नये, याची विशेष खबरदारी घेतली.

यामुळे पाकिस्तानला समजलं की भारताच्या लष्करी क्षमतेची व्याप्ती खूप दूरपर्यंत आहे. त्यामुळेच आता पाकिस्तानचे मंत्री एकामागोमाग एक शांततेच्या वाटा शोधू लागले आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी देखील मागे घेतलेलं पाऊल स्पष्ट करत सांगितले, “जर भारत सीमावर्ती कारवाई थांबवतो, तर आम्हीही तणाव न वाढवण्याचा विचार करू.”


 Give Feedback



 जाहिराती