आदमपूर : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली. पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवलं. ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना चांगलीच अद्दल घडवली. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. काल नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट आदमपूर एअरबेसवर दाखल झाले आणि शूर जवानांची भेट घेतली.आज सकाळी कोणतीही सूचना न देता नरेंद्र मोदींनी वायुदलाच्या हवाई योद्धांची भेट घेतली. आदमपूर हवाई तळ (पंजाब) हा भारतीय हवाई दलाच्या मिग-29 चा तळ आहे. येथील स्क्वॉड्रनला ब्लॅक आर्चर्स म्हणून ओळखले जाते.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पंजाबमधील आदमपूरच्या एअरबेसला भेट दिली. कोणतीही पूर्वसूचना न देता पंतप्रधान मोदी हे एअरबेसवर दाखल झाले. पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या शूर जवानांची भेट घेतली. त्यांनी केलेल्या पराक्रमाबद्दल त्यांचे कौतुक देखील केले. आदमपूर येथे भारताचे मिग 29 ही लढाऊ विमाने तैनात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या शूर जवानांचे कौतुक केले आहे.
अखेर पाकिस्तानने मान्य केलंच…
युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी पाकिस्तानने भारतीय सैन्याकडून झालेल्या मिसाईल हल्ल्यांच्या नुकसानीची माहिती दिली आहे. पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत त्यांचे ११ सैनिक मारले गेल्याचे आणि ७८ सैनिक गंभीर जखमी झाल्याचे मान्य केलं आहे. याशिवाय, गोळीबारात ४० नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानी हवाई दलाचेही मोठे नुकसान झाल्याचेही पाकिस्तानकडून मान्य करण्यात आले आहे.
पंतप्रधान यांनी X वर लिहिले- 'आज सकाळी मी एअर फोर्स स्टेशन आदमपूरला गेलो आणि आमच्या शूर हवाई योद्ध्यांना आणि सैनिकांना भेटलो.' धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयतेचे प्रतीक असलेल्या लोकांसोबत राहणे हा एक अतिशय खास अनुभव होता. आपल्या देशासाठी सर्वस्व देणाऱ्या आपल्या सशस्त्र दलांचे भारत नेहमीच आभारी आहे.सोमवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरबाबत राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात तिन्ही सैन्याच्या सैनिकांचे कौतुक केले होते.
२२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे टीआरएफच्या दहशतवाद्यांनी २८ निष्पाप नागरिकांना मारले होते. त्यानंतरभारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली. ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावरच हल्ले करले. मात्र भारताने सर्व हल्ले परतवून लावले.
युद्धबंदीच्या ५१ तासांनंतर पंतप्रधानांनी २२ मिनिटांचे भाषण दिले पाकिस्तानसोबत युद्धबंदी झाल्यानंतर ५१ तासांनी, पंतप्रधान मोदींनी सोमवारी रात्री ८ वाजता देशाला संबोधित केले. आपल्या २२ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, युद्धबंदी, दहशतवाद, सिंधू पाणी करार आणि पीओके यावर भाष्य केले. पंतप्रधान म्हणाले होते की, ज्या दहशतवाद्यांनी आपल्या माता-भगिनींचे सिंदूर पुसले होते, त्यांचा आम्ही नाश केला आहे. आमच्या कारवाईत १०० हून अधिक भयानक दहशतवादी मारले गेले आहेत.