सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 शहर

महाराष्ट्रात पावसाचा जोरदार तडाखा! ठाणे, रायगड रत्नागिरीसह पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट; प्रशासनालाही सतर्कतेचा इशारा

डिजिटल पुणे    26-05-2025 17:06:29

पुणे : मुंबईनंतर पुणे जिल्ह्यालादेखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.   पुढील ३-४ तासांत रत्नागिरी, पुणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. 

गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने मुंबई पुण्याला चांगलेच झोडले आहे. अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. दौड, बारामतीत पुरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच, हवामान विभागाने पुढील तीन दिवस आणखी मुसळधार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पावसाचा जोर पुढील 48 तास काय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करणच्याचे आदेश देण्यात आलं आहेत. 

दरम्यान आज मुंबईसह पाच  जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात ठाणे, रत्नागिरी, मुंबई, रायगड, सातारा या ठिकाणी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुर, कोल्हापुर घाट परिसर, पुणे घाट परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. परिणामी संभाव्य इशारा लक्ष्यात घेता या सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह विजेचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तीमुळे नागरिकांसह सर्व प्रशासनालाही सतर्क राहण्याचे आदेश मंत्रालयातून देण्यात आले आहे.

मुंबई पाठोपाठ पुण्यातही पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील विधानभवन परिसर, कोथरुड, कर्वे नगर, पुणे स्टेशन , शिवाजी नगर परिसरात पावसाच्या सरी बरसत आहेत. पुण्यात घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर पुणे शहरासाठी येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलाय 

बारामतीत पावसामुळे दाणादाण

बारामतीत पावसामुळे दाणादाण

बारामती तालुक्यात गेल्या 24 तासांत 87 मिलिमीटर पाऊस झाला. याठिकाणी वर्षात साधारणपणे 450 मिलिमीटर पाऊस तालुक्यात पाऊस पडतो. गेल्या 5 दिवसांत त्यापैकी  314 मिलिमीटर पाऊस पडला आहे. नीरा डावा कॅनॉल फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे. 

 नीरा डावा कालवा फुटल्यानं पाणी पालखी महामार्गावर आलं असून काटेवाडी-भवानीनगर हा रस्ता बंद करण्यात आलाय. या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी केली. पिंपळीत हा कालवा फुटला असून आजूबाजूच्या परिसरात असलेल्या शेतीला याचा मोठा फटका बसलाय. दौंडमध्ये पुणे आणि सोलापूर महामार्गावर पाण्याखाली गेला आहे. इथं पाण्याचा प्रवाह इतका होता की एक इनोव्हा कार वाहून गेलीये. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. 


 Give Feedback



 जाहिराती