बार्शी : मागील पंधरा दिवसापासून बार्शी तालुक्यात मान्सून पूर्व सततच्या अतिवृष मुळे झालेले शेती पिकांचे व खरडून गेलेल्या शेत जमिनीच्या नुकसानीचे पंचनामे होऊन धास्तावलेल्या शेतकऱ्यांना खरीप पेरणीपूर्व हेक्टरी पंधरा हजार रुपये तात्काळ मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडी तर्फे बार्शी तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले.यावेळी कृष्णराज बारबोले ,हर्षवर्धन बोधले,सुवर्णा शिवपुरे,रजनी पाटील,महेश चव्हाण,वसीम पठाण,संदीप बोटे,अरुण बनकर ,हनुमंत भोसले व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.