सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ट्रम्प यांच्याशी सुरु असलेल्या वादानंतर आता इलॉन मस्क यांनी थेट राजकीय मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
  • सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेंभुर्णीजवळ ट्रॅव्हल्स खड्यात पलटी; 30 प्रवासी जखमी, 20 जणांची प्रकृती गंभीर
  • सोन्याच्या भावात पुन्हा दरवाढ, मुंबईत 1 लाख पार; लगीनसराईत उतरलेले दागिन्यांचे भाव वधारले
  • चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीखच सांगितली. तर, केवळ नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत तिकीट मिळणार नाही
  • पुण्यातील हिंजवडी परिसरामधील एका 26 वर्षीय आयटी अभियंता तरुणीने 'सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे', अशी चिठ्ठी लिहून 13व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 विश्लेषण

जगातील सगळ्यात उंच चिनाब पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन;पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षाही उंच, जम्मूमधील सुंदर नजारा

डिजिटल पुणे    06-06-2025 17:09:47

जम्मू काश्मीर : जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज असलेल्या ‘चीनाब रेल्वे ब्रिज’ आणि भारतातील पहिला केबल-स्टेड ‘अंजी ब्रिज’ चे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं. मोदींनी चिनाब नदीवरील पुलाच्या डेकवर देशाचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगा फडकवला आणि रेल्वेचे उदघाटन केलं. यावेळी उदघाटनावेळी जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.

तत्पूर्वी चिनाब नदीवरील पुलाच्या उद्घाटन करण्याआधी मोदींनी रेल्वे आर्च ब्रिजची पाहणी केली. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतली आणि चर्चा केली. यूएसबीआरएल प्रकल्पावर काम करणाऱ्या कामगारांशीही यावेळी संवाद साधला.

चिनाब नदीपासून ३५९ मीटर उंचीवर असलेला चिनाब रेल्वे पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे. हा १,३१५ मीटर लांबीचा स्टील आर्च ब्रिज आहे जो भूकंप आणि वाऱ्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी डिझाइन केलेला आहे. जम्मू आणि श्रीनगरमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यात या पुलाचा महत्त्वाचा परिणाम होईल. काश्मीरला देशाच्या उर्वरित भागाशी रेल्वेने जोडणाऱ्या या प्रकल्पाचे काम २०१७ मध्ये सुरू झाले होते. चिनाब रेल ब्रिजमुळे कटरा आणि श्रीनगर दरम्यानचा प्रवासाचा वेळ 3 तासांनी कमी होईल. 

चिनाब रेल्वे ब्रीजची खास वैशिष्ट्ये 

चिनाब रेल्वे ब्रिज हा फ्रान्सच्या आयफेल टॉवरपेक्षा सुद्धा उंच आहे. आयफेल टॉवरची उंची ३३० मीटर आहे, तर चिनाब ब्रिजची उंची ३५९ मीटर आहे.

भारतीय अभियांत्रिकीचा अभिमान – चिनाब रेल्वे पूल

काश्मीर खोऱ्याला देशाच्या उर्वरित भागाशी जोडणारा हा पूल जम्मू-उधमपूर-कटरा-काजीगुंड-बारामुल्ला मार्गाचा भाग आहे. चिनाब नदीपासून तब्बल ३५९ मीटर उंचीवर असलेला हा पूल पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच आहे. तसेच कुतुब मिनारपेक्षा पाचपट अधिक उंचीचा आहे. या पूलाची एकूण लांबी १,३१५ मीटर असून, यामध्ये ४६७ मीटर लांबीचा मुख्य आर्च स्पॅन आहे. हा स्पॅन ब्रॉड गेज रेल्वे लाईनवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा आहे.

भक्कम बांधणी, अभूतपूर्व वैशिष्ट्ये

चिनाब रेल्वे ब्रिजची लांबी १३१५ मीटर आहे आणि रुंदी १३ मीटर आहे.

हा ब्रिज ताशी २६६ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा सामना करू शकतो.

तसेच, हा ब्रिज भूकंपीय झोन पाचमध्ये स्थित असून, रिक्टर स्केलवर 8 तीव्रतेच्या भूकंपालाही सहन करण्यास सक्षम आहे.

१२० वर्षांपर्यंत या ब्रिजला कोणताही धोका नसल्याचं बोललं जाते.

ब्रिज दरम्यान तब्बल ११२ सेन्सर बसवण्यात आले आहेत, जे वाऱ्याचा वेग, तापमान आणि कंपन इत्यादी माहिती देतील.

चिनाब ब्रिज उभारणीसाठी ३०३५० मेट्रिक टन स्टील वापरण्यात आले आहे.

१५० सर्व्हरच्या सुविधेसह सुसज्ज एक अत्याधुनिक नियंत्रण कक्ष बांधण्यात आला आहे.

हा पूल इतका मजबूत आहे की स्फोट झाला तरी त्याचे नुकसान होणार नाही.

भूकंप व स्फोट प्रतिरोधक डिझाईन: ८ रिश्टर स्केलपर्यंतचा भूकंप किंवा ४० किलोग्रॅम टीएनटीच्या स्फोटालाही तोंड देण्याची क्षमता.

वाऱ्याचा आघात सहन करणारा: ताशी २६० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा सामना करतो.

डिझाइन आयुष्य: तब्बल १२० वर्षे टिकणारे डिझाइन.

 स्टीलचा वापर: या प्रकल्पासाठी एकूण ३०,३५० टन स्टील वापरण्यात आले.

अतिरिक्त सुविधा: पूलावर फुटपाथ व सायकल मार्ग देखील उपलब्ध.

वाहतुकीत क्रांतिकारी बदल

या पुलामुळे काश्मीरमधील मालवाहतुकीत क्रांतिकारी बदल होणार आहे. सध्या दिल्लीहून ट्रकद्वारे सामान पोहोचवायला ४८ तासांपेक्षा अधिक वेळ लागतो. पूल सुरू झाल्यानंतर हा वेळ २०–२२ तासांनी कमी होणार आहे, त्यामुळे व्यापार, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा बूस्ट मिळणार आहे.

देशासाठी गौरवाचा क्षण

चिनाब पूल हे भारतीय अभियंत्यांच्या कौशल्याचे प्रतीक ठरले आहे. पंतप्रधान मोदी यांनी या ऐतिहासिक प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी देशवासीयांना संबोधित करताना सांगितले की, “हा पूल केवळ काश्मीरला भारताशी जोडणारा मार्ग नाही, तर तो नवभारताच्या प्रगतीचा मार्ग आहे.”


 Give Feedback



 जाहिराती