पुणे : श्रीक्षेत्र आळंदी- मोशी परिसरामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका नवीन विकास आराखड्यामध्ये कत्तलखाना प्रस्तावित केला होता. सदर आरक्षण रद्द करण्याबाबत आम्ही प्रशासनाने मागणी केली. ग्रामस्थ, भूमिपुत्र, शेतकरी आणि तमाम हिंदू बांधवांच्या मागणीचा मान ठेवून मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी कत्तलखाना रद्द करण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, वारकरी सांप्रदाय आणि अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मी त्यांना आश्वासित करतो की, आपल्या राज्यात आता भाजपा महायुतीचे सरकार आहे. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी देव-देश अन् धर्मासाठी आपल्या संस्कृतीसाठी कायम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे गोपूजा, गोसंवर्धन आणि हिंदू संस्कृती संवर्धनासाठी आपण सर्वजण काम करीत आहोत. श्रीक्षेत्र आळंदी- मोशीसारख्या संतभूमीमध्ये आम्ही कदापि कत्तलखाना होवू देणार नाही.
मोशी-आळंदीच्या परिसरातील सदर कत्तलखाना आरक्षण रद्द करण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केली. आता राज्य सरकारचा अधिकृत आदेश मिळवण्यासाठीसुद्धा आम्ही पाठपुरावा करणार आहोत. मला सांगायला अभिमान वाटतो की, मौजे चऱ्होलीची टीपी स्किम रद्द करण्याचा आदेश जाहीर कार्यक्रमात दिला होता. ‘‘दुपारी आदेश आणि संध्याकाळी महापालिकेत प्रस्तावाला अधिकृत मंजुरी...’’ असा निर्णय झाला. आता कत्तलखाना रद्द करण्यासाठी महापालिका प्रशासन कार्यवाही करेल. त्यासाठी राज्य सरकारकडे सर्वोतोपरी पाठपुरावा करेन, असा विश्वास देतो.