सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 क्राईम

क्रिकेट खेळताना वाद! आठवीच्या विद्यार्थ्याकडून दहावीतील मित्राची हत्या; शाळेत जेवणाच्या सुट्टीमध्ये घडला प्रकार, अहिल्यानगरमध्ये खळबळ

डिजिटल पुणे    26-06-2025 11:02:21

अहिल्यानगर: अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादातून आठवीतील विद्यार्थ्याने केली मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे. अहिल्यानगरमधील एका नामांकित शाळेत एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केला. या हल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याला शिक्षकांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार ज्या विद्यार्थ्याने हा हल्ला केला तो आठवीत शिकतो तर हल्ला झालेला विद्यार्थी दहावीत शिकत होता. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. शाळेत सकाळी दहावीची बोर्डाची पुरवणी परीक्षा होती. मधल्या सुटीत मुले खेळत होती. त्यावेळी आठवीतील विद्यार्थ्याने शाळेच्या प्रांगणात दहावीच्या विद्यार्थ्याच्या चाकून हल्ला केला. त्याने त्याच्या पोटावर आणि डोक्यावर गंभीर वार केले.

या हल्ल्यात दहावीचा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. याबाबत शाळेतील शिक्षकांना कळताच ते धावत आले आणि जखमी विद्यार्थ्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले. परंतु रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही शाळा अहिल्यानगरच्या बागडपट्टी परिसरात आहे. ही दोन्ही मुले सर्जेपुरा परिसरात राहतात आणि त्यांची घरेही एकमेकांच्या जवळच आहेत.

दुपारी शाळा सुटताच दोघांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून भांडण झाले. यावर त्याच्या शाळेतील दुसऱ्या विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केला. हा हल्ला कानाच्या मागे झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

जुन्या वादातून केली हत्या?

दरम्यान मयत विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की, माझा मुलगा माझ्या सासूच्या घरासमोर क्रिकेट खेळण्यासाठी जात होता. त्या परिसरातील एक कुटुंब हे नेहमी घरी भांडणासाठी येत होते. ‘तुमच्या मुलाला समजावून सांगा, अन्यथा आम्ही त्याला जीवंत सोडणार नाही,’ अशा धमक्या ते देत होते. याबाबत आपल्या बहिणीने तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये 2024 मध्ये या कुटुंबाविरोधात तक्रारही दिली होती. या जुन्या भांडणाच्या कारणावरून हा खून झाला आहे."

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर बालगुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. ही घटना शालेय परिसरातील सुरक्षेच्या नियमांबाबत अनेक प्रश्न निर्माण करत आहे.


 Give Feedback



 जाहिराती