मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर खंडाळ्यानजीक दत्ता फूडमॉलसमोर दुपारी मोठा अपघात झाला. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे तब्बल20 ते 25 गाड्या एकमेकांवर आदळल्याने अनेक वाहनांचा चक्काचूर झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. भारतातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी असलेल्या या महामार्गावर दररोज दीड ते दोन लाख वाहने धावत असतात. पोलीस वाहतूक नियोजन असतानाही या अपघातामुळे संपूर्ण व्यवस्था कोलमडली असून सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहने रांगेत अडकली आहेत. घटनास्थळी पोलीस व आपत्कालीन पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज एक भीषण अपघात झाला. बोरघाटात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने 20 ते 25 वाहनांना धडक दिली. या अपघातात अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, काही प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आज दुपारी झाला. खोपोली आणि लोणावळा दरम्यान, खंडाळ्याच्या जवळ हा अपघात झाला. कंटेनरचा ब्रेक अचानकपणे फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने समोरच्या वाहनांना धडक दिली.
या अपघातात 20 ते 25 वाहने एकमेकांवर आदळल्याची माहिती आहे. अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत