सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
  • : राणीच्या बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, श्वसननलिकेत हाड अडकलं, उपचार न मिळाल्याने जीव सोडला?
  • नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त, भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
  • राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
  • मुंबईत 11 लाख दुबार मतदार, निवडणूक आयोगाने केलं मान्य एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा, ठाकरे बंधूंचा दावा खरा ठरला
 जिल्हा

भाजप संपूर्ण देशात बटेंगे तो कटेंगे म्हणत समाजात विभागणी करत आली आहे. उरणमध्ये जुडेंगे तो बढेंगे म्हणत आपल्याला उरणचा विकास करायचा आहे - घाणेकर

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    27-11-2025 10:39:19

उरण : काही दिवसांपूर्वी जेव्हा आपल्या उरणची कन्या यशश्री शिंदे हिचा मृत्यू झाला, तेव्हा राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी उरणमध्ये येऊन संपूर्ण मुस्लिम समाजाला टार्गेट केले होते. त्या वेळेस आपल्या उरणचे आमदार एक शब्दानेही काही बोलले नाहीत, ना त्यांनी उरणमधील सर्व मुस्लिम बांधवांच्या बाजूने कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली. आता जेव्हा निवडणूक तोंडावर आली असताना, मुस्लिम बांधवांच्या मतांसाठी त्यांनी उर्दूमध्ये पत्रके छापून सर्व मुस्लिम बंधू-भगिनींना 'दावतचे' निमंत्रण दिले आहे अशी टीका उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी आमदार महेश बालदींवर केली आहे. 


उरण येथील मस्जिद मोहल्ला परिसरात महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची प्रचार सभा उत्साहात पार पडली. या सभेला ठाण्याहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या युवा नेत्या मर्झिया पठाण उपस्थित होत्या. त्याचबरोबर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वीडियो कॉलिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
या सभेत मर्झिया पठाण यांनी उपस्थित सर्व प्रभाग क्रमांक ५ मधील रहिवाशांना एकतेची ताकद काय असते हे सांगितले आणि सर्व धर्म समभावाचा संदेश, जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तसेच महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचा धर्म आहे. 


यावेळी भावना घाणेकर म्हणाल्या की, मुस्लिम बांधवांनी हे विसरू नये की भाजप संपूर्ण देशात "बटेंगे तो कटेंगे" म्हणत समाजात विभागणी करत आली आहे. आपल्याला उरणमध्ये "जुडेंगे तो बढेंगे" हेच आपले ध्येय मानून एक दिलाने, एकत्रित रित्या या उरणचा विकास करायचा आहे.


 Give Feedback



 जाहिराती