बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचं आज विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीमध्ये येत असताना आज (28 जानेवारी) अजित पवार यांच्या विमानाचा लॅंडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. विमान लँडिग होतानाच अपघात झाला आणि विमानाने पेट घेतला. अपघातानंतर विमानाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते. अपघात झाला त्यावेळी अजित पवार यांच्यासह विमानात पाच जण होते. विमानात अजित पवार आणि त्यांचे सुरक्षारक्षक देखील होते. विमानाचा अपघात झाला त्यानंतर अवघ्या काही वेळातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अचानक समोर आलेल्या या घटनेने सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. काल (मंगळवारी, ता २७) अजित पवार कॅबिनेट बैठकीसाठी अजित पवार मुंबईला गेले होते, ते मुंबईतून बारामतीत आल्यानंतर हा अपघात झाला आहे. तर काल त्यांनी मुंबईत केलेली कामे आणि त्यांचा तपशील देखील समोर आला आहे.अजित पवार कायमच अॅक्शन मोडमध्ये दिसायचे. पहाटेच्या सुमारास ते आपल्या कामाला सुरूवात करायचे. वेळेवर न येणाऱ्या अधिकऱ्यांना ते अनेकदा झापायचे. काल त्यांनी मुंबईतील केलेल्या कामाचा तपशील समोर आला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे आज (२८ जानेवारी) बारामती विमानतळावर विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले.मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या खासगी विमानाने लँडिंगचा प्रयत्न करताना तांत्रिक कारणास्तव धावपट्टीवरून बाजूला जाऊन शेतात आदळल्याची प्राथमिक माहिती आहे. विमान आग लागल्याने क्षणार्धातच संपूर्ण विमान जळून खाक झाले. या अपघातात अजित पवारांसह एकूण ५ जणांचा मृत्यू झाला. यात त्यांचे सुरक्षारक्षक आणि वैमानिकांचा समावेश आहे.
अजित पवार यांनी शेवटच्या दिवशी काय काम केले?
अजित पवार हे कायमच अॅक्शन मोडमध्ये राहायचे. सकाळी ८.३० वाजता ते मंत्रालयात हजर झाले आणि आलेल्या सर्व फाईल्स क्लिअर केल्या.ते वित्त विभागाचे सचिव, महसूल विभागाचे सचिव, GST commissioner, excise commissioner यांच्यासह राज्याच्या आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा आढावा घेतले आणि उत्पन्न वाढीसाठी सूचना दिल्या. ही बैठक दीड तास चालली.यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्र्यांसोबत कॅबिनेट बैठकी संदर्भात चर्चा केली. कॅबिनेट बैठक, पायाभूत सुविधा समिती बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा केली आणि दुपारी २.३० वाजता देवगिरीकडे रवाना झाले.अजित पवार यांच्या या शेवटच्या दिवशी देखील राज्याच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी कार्यरत राहणे हे त्यांच्या कार्याची साक्ष आहे.
विमानात कोण होते?
अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक
अपघाताची घटना
विमान बारामती विमानतळावर सकाळी ९ ते ९:१५ च्या सुमारास लँडिंग करताना धावपट्टीवरून बाजूला जाऊन शेतात आदळले. विमान आग लागल्यामुळे संपूर्ण विमान तुर्कद्रुतीनं जळून खाक झाले.घटनेनंतर स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. DGCA कडून या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे.बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी चार महत्त्वाच्या सभांना संबोधित करणे अपेक्षित होते, मात्र या दुर्दैवी अपघातामुळे ते त्या सभेला पोहोचू शकले नाहीत.