बारामती –महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला
आज सकाळी महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. आज (२८ जानेवारी) सकाळी मुंबईहून बारामतीकडे विमानाने निघालेल्या अजित पवारांसह ५ जणांचा अपघातात मृत्यू झाला.अजित पवार यांनी अपघात होण्यापूर्वी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी शेवटचा फोन संवाद केला होता. राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले,
"आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक दिवसांपैकी एक आहे. काका म्हणून नाही तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारे, धीर देणारे आणि कठीण प्रसंगी खंबीरपणे उभं राहायला शिकवणारे व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले आहे. त्यांनी लहानपणापासून राजकारण, समाजकारण आणि जबाबदारी यांचा खरा अर्थ कृतीतून शिकवला. त्यांच्या जाण्याने राज्याला आणि आमच्या कुटुंबाला अपुरं नुकसान झालं आहे."
राणाजगजीतसिंह पाटील यांनी अपघात होण्यापूर्वीच्या फोन संवादाची आठवण सांगताना भावनिक शब्दांत सांगितले की, "नेहमीप्रमाणे आपुलकीने बोलणारा तो आवाज अजूनही कानात घुमतो आहे. अवघ्या अर्ध्या तासात ही दुर्दैवी बातमी समजली."
अपघात कसा झाला?
सकाळी ८.१० – मुंबईहून लियरजेट ४५ एक्सआर विमान बारामतीकडे उड्डाण
सकाळी ८.४० – विमान बारामती एअरस्ट्रीपच्या जवळ; तांत्रिक बिघाड
सकाळी ८.४६ – तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचं नियंत्रण सुटलं; गोजुबावी परिसरातील शेतात विमान कोसळलं
विमानातील प्रवासी:
अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक
बारामतीतील या अपघाताने केवळ कुटुंबाचं नाही तर संपूर्ण राज्याचं नुकसान झालं आहे. अनुभवी, लोकहितासाठी झटणारे आणि शेतकरी, कष्टकरी यांच्या समस्या समजून काम करणारे नेतृत्व आता हरपले असल्याची जाणीव राज्याला दीर्घकाळ राहणार आहे.