सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
  • युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
  • मोठी बातमी! केंद्राकडून 2026 मध्ये घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय
  • पुढील तीन दिवस उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये उच्चांकी तापमान वाढणार, राज्यात उष्माघाताचा धोका वाढला, हवामान विभागाने दिला इशारा
 राज्य

इंधन बचतीसाठी 'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय; केंद्र सरकार मोठ्या धोरणाच्या तयारीत?

डिजिटल पुणे    11-05-2026 17:13:08

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केले आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर गरजेपुरताच करण्यासोबतच शक्य असेल तिथे कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘हायब्रिड वर्क मॉडेल’चा अवलंब करावा, असे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार या संदर्भात मोठे धोरणात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कोरोना काळात घरून काम करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर स्वीकारली गेली होती. आयटी, मीडिया, बँकिंग आणि कन्सल्टिंगसारख्या क्षेत्रांमध्ये या मॉडेलमुळे इंधनाची बचत झाली होती. दररोजच्या प्रवासाचा खर्च कमी झाला, वाहतूक कोंडी घटली आणि प्रदूषणातही लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळाले होते.

सरकारच्या मते, पुन्हा एकदा हायब्रिड किंवा वर्क फ्रॉम होम पद्धतीचा अवलंब केल्यास इंधन वापरात मोठी कपात होऊ शकते. यामुळे सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी होईल आणि शहरांतील ट्रॅफिकची समस्याही आटोक्यात येण्यास मदत होईल.

भारत मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करत असल्याने इंधन बचत ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची मानली जात आहे. तेल आयातीवरील खर्च कमी झाल्यास परकीय चलन साठ्यावरचा दबाव कमी होऊ शकतो. तसेच कंपन्यांचाही कार्यालयीन खर्च कमी करण्यास मदत होणार आहे.

तज्ज्ञांच्या मते, सर्व क्षेत्रांमध्ये घरून काम करणे शक्य नसले तरी डिजिटल आणि सेवा क्षेत्रात हा पर्याय प्रभावी ठरू शकतो. सरकारकडून यासाठी प्रोत्साहनपर धोरण आखण्यात आल्यास ऊर्जा बचतीसोबत पर्यावरण संरक्षणालाही चालना मिळू शकते.पंतप्रधान मोदी यांच्या या आवाहनातून ऊर्जा बचत, आर्थिक स्वावलंबन आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश देण्यात आल्याचे मानले जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती