सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
  • युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
  • मोठी बातमी! केंद्राकडून 2026 मध्ये घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय
  • पुढील तीन दिवस उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये उच्चांकी तापमान वाढणार, राज्यात उष्माघाताचा धोका वाढला, हवामान विभागाने दिला इशारा
 शहर

पुढील तीन दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट; मराठवाडा–मध्य महाराष्ट्रात तापमानाचा कहर, हवामान विभागाचा इशारा

डिजिटल पुणे    12-05-2026 14:20:04

पुणे : राज्यात पुढील तीन दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ सखाराम सानप यांच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात मोठी वाढ होणार असून अनेक ठिकाणी पारा नव्या उच्चांकी स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. अकोला आणि नंदुरबार येथे तापमान 45 अंशांहून अधिक नोंदवले गेले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवसांसाठी राज्यातील अनेक भागांना यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र जाणवणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांत अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला होता, मात्र आता पावसाची शक्यता कमी असल्याने तापमानात पुन्हा वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.तीव्र उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असून रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती