पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे ग्रंथालय आणि युवक क्रांती दलाच्या वतीने 'किताबे कुछ कहती है ' हा चर्चात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . शनिवार,दि.२१ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत हा कार्यक्रम गांधी भवन(कोथरूड) येथे होणार आहे.ख्यातनाम पत्रकार रवीश कुमार यांच्या ' बोलना ही है' ,'इष्क में शहर होना' या दोन पुस्तकावर चर्चा आयोजित करण्यात आली असून पत्रकार,लेखिका हिना खान या वक्त्या म्हणून सहभागी होणार आहेत.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी हे या उपक्रमाचे निमंत्रक असून प्रा.डॉ.शशिकला राय या समन्वयक आहेत.कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अन्वर राजन,जांबुवंत मनोहर,अप्पा अनारसे,अॅड.स्वप्नील तोंडे,कैलास यादव यांनी केले आहे .