पुणे : ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारे क्षेत्र म्हणजे साखर उद्योग. उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे चेअरमन डॉ. राहुल शिवाजीराव कदम यांच्याशी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी या उद्योगाच्या प्रश्नांवर नुकतीच पुणे येथे चर्चा केली. साखर उद्योगाने देशाच्या विकासात दिलेले योगदान आणि सध्या त्यासमोर असलेली आव्हाने याबाबत डॉ. राहुलदादा यांनी सविस्तर माहिती दिली. त्याप्रसंगी घेतलेले छायाचित्र.समवेत डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे पदाधिकारी नंदकुमार सुतार व महेश कुगांवकर..