पुणे : सिंहगड रोड येथील नन्हे-धायरी रस्त्यावरील पारी कंपनीजवळ असलेल्या कचरा प्रकल्पाला भीषण आग लागली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.पहाटे अडीच-तीनच्या सुमारास धायरी येथील पारी कंपनीजवळील कचरा प्रकल्पाला आग लागली. आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाचे आनंदनगर केंद्र, नवले केंद्र, कात्रज, एरंडवणा येथील बंब बोलवण्यात आले. त्यानंतर पाण्याचे टँकर देखील बोलवण्यात आले.
नन्हे - धायरी रस्त्यावरील पारी कंपनीजवळ असलेल्या या कचरा प्रकल्पाला पहाटे अडीच-तीनच्या सुमारास आग लागल्याचे लक्षात आल्याने सजग नागरिकांनी याबाबत अग्निशमन दलाला कळविले. त्यानंतर अग्निशामन दलाच्या जवळ मिळतात का घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली. आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाचे आनंदनगर केंद्र, नवले केंद्र, कात्रज, एरंडवणा येथील बंब बोलवण्यात आले. त्यानंतर पाण्याचे टँकर देखील बोलवण्यात आले. या ठिकाणी ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. त्यामुळे तेथे कचऱ्याचे खूप मोठे ढीग होते. आग विझवण्याचे काम अजूनही सुरू आहे.
जेसीबी बोलून कचऱ्याचे ढीग काढून, तेथे आग विझवण्याचे काम सुरू आहे. या कचरा प्रकल्पाला लागून अनेक मोठे गृहप्रकल्प आहेत. मात्र, सुदैवाने आग पसरली नाही. ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलास यश आले आहे. नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आली नाही.
या ठिकाणी ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. त्यामुळे तेथे कचऱ्याचे खूप मोठे ढीग होते. आग विझवण्याचे काम अजूनही सुरू आहे. जेसीबी बोलून कचऱ्याचे ढीग काढून, तेथे आग विझवण्याचे काम सुरू असल्याचे आनंदनगर अग्निशमन केंद्राचे प्रमुख यांनी सांगितले.या कचरा प्रकल्पाला लागून अनेक मोठे गृहप्रकल्प आहेत. मात्र सुदैवाने आग पसरली नाही ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलास यश आले आहे.