सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 व्यक्ती विशेष

'शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर तत्वज्ञान सांगताना फडणवीसांना लाज वाटत नाही' - भास्कर जाधव

डिजिटल पुणे    29-08-2024 10:32:44

रत्नागिरी : राजकोट किल्ल्यावरील झालेल्या घटनेवरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याठिकाणी राज्यकर्त्यांनी शरमेने माना खाली घालून बसायला पाहिजे. लोकांना तत्वज्ञान सांगणारे देवेंद्र फडणवीस यांनाही या घटनेबद्दल थोडीशीही लाज वाटत नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

यावेळी भास्कर जाधव यांनी राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेवरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार आगपाखड केली. २०१९ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच घाईघाईने शिवाजी महाराजांचा हा पुतळा उभारण्यात आला होता. समुद्रकिनाऱ्यावर जोरदार हवा येणार हे सरकारला माहिती नव्हते का?, असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. याशिवाय, विरोधी पक्षाचे लोक घटनास्थळी येत असतील तर त्यांना अडवण्याचे कारण काय?  अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे प्रस्तावित स्मारक हे त्याचे उदाहरण आहे.२०१९ सालच्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मुंबईतील अरबी समुद्रात वेगवेगळ्या नद्यांचं जल आणि माती आणून भूमिपूजन केले. तो पुतळा उभारला गेला का? राजकोट किल्ल्यावरील पुतळाही निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच उभा केला ना? किल्ले प्रतापगडावरील काँग्रेस सरकारच्या काळात ७० वर्षांपूर्वी बांधलेला अश्वारुढ पुतळा १२५ किलोमीटर ताशी वेगाच्या वाऱ्यामध्ये देखील दिमाखात उभा आहे. मात्र, आठ महिन्यापूर्वी बांधलेला पुतळा ४५ किलोमीटर ताशी वेगाच्या वाऱ्याने पडत असेल तर त्याला काय म्हणावे, असा सवालही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.

या घटनेची जबाबदारी आता कोणी घेणार नाही. कारण, लोकसभेला मतं मिळवण्यासाठी शिवरायांचा पुतळा उभारला. तो पुतळा उभारणारा आपटे नावाच्या माणसाने त्यापूर्वी किती पुतळे बनवले होते, किती साईजचे बनवले होते, जागेचा अभ्यास कोणी केला होता?, कोण इतिहासकार होते? फक्त आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करुन मतं मिळवण्याची रणनीती होती. ही मतं मिळाली पण आता पुतळा कोसळल्याची जबाबदारी कोण घेणार? कोणीच घ्यायला तयार नाही.अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

 

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती